अहमदनगर भूईकोटकिल्ला शहराच्या पुर्व दिशेला भुईकोट किल्ला आहे. भुईकोट किल्ला हा हुसेन निझामशाह यांनी १५५३ साली बांधण्यास सुरवात केली. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात.
कसे जाल edit
- अहमदनगर शहरातून भिंगारहून जाणाऱ्या बसेस किंवा शहर वाहतूकीच्या बसने जाता येते.